ताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘अतिशहाणा त्याचा बैल रिकामा’,…..धरणाच्या गेटजवळ कारमध्ये बसून गटारी साजरी करत होते, धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडले, अन गेले वाहून

ही घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण क्षेत्रात घडली आहे.

माणदेश एक्सप्रेस न्युज : कल्याण : शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात गटारीची पार्टी साजरी करण्यासाठी कल्याण येथील पाच जण कारने गेले होते. ३ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पार्टी करण्यासाठी तानसा धरणाच्या गेटच्या खाली कारमध्ये बसून पार्टी करत असताना अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडले. अन् कारसह पाच जण वाहून गेले. यातील तीन सुखरूप बाहेर आले. परंतु दोघांना आपला जीव गमवावा लागला. आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे, ‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ याचा प्रचिती या घटनेमुळे आली आहे.

आज पासून श्रावण महिन्यास सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यात मासांहारी जेवण आणि मद्यपान अनेक जण करत नाही. त्यामुळे गटारी अमावस्याला पार्टी केली जाते. परंतु हीच दारू पार्टी जीवावर बेतली. ही घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण क्षेत्रात घडली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पाच मित्र कारमध्ये बसून धरणाच्या मुख्य प्रवाह असलेल्या गेटजवळ गटारीची पार्टी करत होते. त्याच सुमाराला अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने पाच जण कारसह नदीच्या प्रवाहात वाहून जात होते. त्यापैकी एकाचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला तर दुसरा बेपत्ता झाला. तीन जण कारमधून उड्या मारून वाहत्या प्रवाहामधून बचावले आहेत. गणपत चिमाजी शेलकंदे (रा.कल्याण) असे या दुघटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button